
10 वी चा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठो विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरू होते. आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा म्हणून सर्वच पालक प्रयत्न शील असतात. आता राज्यभरात 11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची सुरवात 19 मे पासून होणार असून, 11 वीचे वर्ग 19 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत.
∎ शाळा-महाविद्यालयाना कसे होता येणार या प्रक्रियेत सामील -
शासन मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत, अंशता अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांना या प्रक्रियेत सामील होता येणार असून, यासाठी यांना 15 मे पर्यंत शिक्षण विभागाच्या वेबसाईट वर नोंदणी करावी लागणार आहे.
∎ विद्यार्थ्याना कधी आणि कशी करावी लागणार प्रक्रिया -
10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 19 मे पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना 10 पसंती क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यानंतर 28 मे पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवत्तेनुसार राबवली जाईल. मात्र, अद्याप यासाठी तारखा जाहीर झालेल्या नाहीत.
∎ 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2025-26 संदर्भात महत्त्वाचे मुद्दे ∎
माहिती भाग 1
1) ऑनलाइन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल.
2) विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयाची माहिती मिळेल.
3) विद्यार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंती क्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमी एक कॉलेज व जास्तीत जास्त दहा कॉलेजची नावे टाकता येतील.
4) https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील.
5) विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशा संदर्भातील माहिती पुस्तिका डाऊनलोड करता येईल. ती संपूर्ण वाचून अर्ज भरावा.
6) विद्यार्थी वैयक्तिक माहिती - नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, दहावीचे विषय त्यांचे माध्यम, जात, संवर्ग, क्रीडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी.
7) विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक्य कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. ते व्हेरिफाइड करूनच कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रवेश निकषाच्या आधारे निश्चित करेल.
8) अर्जातील भाग एक परिपूर्ण भरून लॉक / प्रमाणित करण्यासाठी दहावीच्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा. तेथे व्हेरिफिकेशन केले जाईल. भाग एकच्या डॅशबोर्डवर व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
9) भाग एक मधील माहितीची दुरुस्ती दहावीच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल. अर्जाची प्रिंट काढावी.
10) विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर केल्या बाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल.
11) सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पाहता येईल.
माहिती भाग 2
माहिती भाग 3